नमस्कार शेतकरी बंधूंनो , आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणे, औषधे व खते वितरण अनुदान 2022 योजने संबंधित या लेखात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा. कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वरती सुरू आहेत. या योजनेचा नक्कीच लाभ घ्या.
केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे :
राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
अ) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
ब)ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
क) ऊस – (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
ड) कापूस – (अमरावती विभाग) – अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ. (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
इ) रागी – ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
(लातूर विभाग) – उस्मानाबाद,नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
हे पण वाचा, कुसुम सोलर पंप योजना 2022
येथे क्लिक करा |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
- जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.
- कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला
- वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
- संबंधीत शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२ व ८/अ उतारा असणे बंधनकारक राहील.
मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या
मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8
शेतकरी बंधूंनो शासन हे अशाप्रकारे खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्याच शेतकरी बांधवांना माहीतच नसतं. कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा
(ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला फक्त त्यांंच्यासाठी)
WhatsApp Group Link |
No comments:
Post a Comment