आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात. या लेखामधे आपण आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना या योजनेबद्दल सम्पुर्ण माहीती पाहणार आहे. तर सम्पुर्ण लेख आवश्यक वाचा.
मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. एबीवाय योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाही संबोधले जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे.
आयुष्मान भारत योजनेचे उदिष्ट -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रधानमंत्री जन आरोग्य' योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे.
एबीवायमध्ये कोणाला मिळत आहे विमा कव्हर ?
केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना एबीवाय योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कुटूंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही.
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता निश्चित कशी होते?
ग्रामीण भागात आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता -
आयुष्मान भारत योजना (एबीवाई) मध्ये सामील होण्यासाठी खालील पात्रता निश्चित करण्यात आली आहे -
शहरी आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता -
आयुष्मान भारत योजना (एबीवाय) मध्ये सामील होण्यासाठी खास पात्रता खालीलप्रमाणे आहे -
भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती. कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहेत.
तुमचा 2000 रुपयांचा हप्ता का आला नाही? असे पाहा त्याचे कारण ..
आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया -
आयुष्मान भारत योजनेत काय-काय आहे सामील?
एबीवाय (ABY) लाभार्थ्यांची योग्यता काय आहे?
कोणत्या रुग्णालयात होईल एबीवाय लाभार्थ्यांवर उपचार?
आयुष्मान भारत रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती, आणि तुम्ही या योजनेस पात्र आहे का हे पाहण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment